Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

 

Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध
Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

 

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध लेखन / Shetkaryache Manogat Nibandh Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Shetkaryache Manogat Nibandh Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.

… 

पोळ्याचा सण होता. आम्ही सर्वजण अर्जुनदादांच्या घरी खास आग्रहास्तव जेवायला गेलो होतो. अर्जुनदादा, आमच्या परिसरातील प्रगतिशील नी प्रयोगशील शेतकरी शास्त्रीय पद्धतीने शेती करणारे एक सधन शेतकरी. जेवण झाल्यावर बाहेरच्या ओट्यावर सर्वजण गप्पा मारीत बसलो होतो. साहजिकच शेती विषयावर गप्पा जास्त रंगत गेल्या. आमची पण थोडीफार जमीन असल्याने, मी ही मन देऊन ऐकू लागलो.

अर्जुनदादा सांगत होते, “आठवतं तुम्हाला, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काही दशकांत जगातल्या अन्नधान्यांचे उत्पादन खूप वाढले. त्या ‘हरितक्रांतीची कारणं होती, संकरित बी-बियाणं, रासायनिक खतं आणि शक्तीशाली कीटकनाशकं, पण गेल्या काही वर्षांत शेतीउत्पादनाचा मूलाधार… जी जमीन, तीच हळूहळू ‘निकस होत गेली. गांडुळासारखे प्राणी, अन्य कीटक मरून जाऊ लागले. मातीचा जिवंतपणा गेला, जळजळीत खतांमुळे आम्ही शेतकऱ्यांनी जमिनीला पाणीही भरमसाठ पाजले, त्यामुळे त्या पाणथळ झाल्या, खारवल्या. हजारो एकर शेतजमिनी नापीक झाल्या. कुठेतरी हे थांबलं पाहिजे.

जमिनींची पुढील हानी टाळायची असेल, तर नैसर्गिक, सेंद्रिय खतांच्या वापराकडे परत वळावे लागेल. शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखताचा सढळ वापर करावा लागेल. जमिनीचं जे आपण ओरबाडून घेतलंय, वापरलंय, ते तिला परत करण्याचा हाच उपाय आहे तरच नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड ही जैविक चक्रं पूर्ववत् होतील. अरे जमिनीला आपण ‘आई’ मानतो. ती काही यंत्र नाही. ‘भांडवल घातलं की धान्य द्यायला, ऊस हे तर आळशी शेतकऱ्याचं पीक. ज्याला कामाचा आळस, तो ऊस लावती असे माझं प्रामाणिक मत आहे. पैशाच्या मोहात पडून उसांमुळे जमिनी भिजट होतात व नापीकही ! आणि भूजलसाठे तरी कुठे उपलब्ध आहेत! विहिरी, तळी, कूपनलिका जानेवारीतच आटतात.

अनियमित पाऊस, पाण्याची अयोग्य साठवण, जलसंधारणाचा अभाव व भूजलाचा प्रचंड उपसा ह्यामुळे पाणी ही साधनसंपत्ती संपुष्टात येत आहे. वाढते प्रदूषण नि भयावह वृक्षतोडीमुळे संकटात भरच पडतेय. त्यासाठी मला वाटतं प्रत्येकानं जर ठिबक सिंचन, फवारा सिंचनाद्वारे शेतीच्या पाण्याच व्यवस्थापन व नियोजन केलं, तर आहे त्या पाण्यात जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येईल. विजेच्या भारनियमनाचा बाऊ न करता वाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पवनचक्क्या वापरून निर्माण होणान्या वीजेवर शेतात पाणी खेळवता येईल. जमिनीच्या उंचवट्याच्या जागी खोदकाम करून ‘शेततळे’ तयार करता येईल. खतासाठी वापर ‘सायफन’ पद्धतीने शेततळ्यातील पाणी शेतासाठी वापरता येईल. जमिनींचा कम कायम सहावा ह्यासाठी मिश्रपिक घेणं, शैवालाचा, तागांचा…. करणं, कीटकनाशक म्हणून कडुनिंब, लसूण, गोमूत्र, हिंग, वेखंड यांचा वापर करण, जमिनीला गांडुळखताचं विरजण लावणं, अशा अनेक उपायांनी निसर्गाच्या जवळ जात शेती करणं कधीही फायद्याचंच.

कधी कधी वाटतं शेतकरी प्रामाणिकपणे शेती करतो. रक्ताचं पाणी करून मळा फुलवतो, भाजीपाला पिकवती. मोत्याची कणसं बाजारात आणतो. समाजाचा अन्नदाता म्हणून त्याचा गौरवही होतो, पण… त्याच्या हाती त्या उत्पादिताचं खरं मोल, खरी किंमत पड़ते का? जेव्हा तजेलदार दोडकी, निरोगी कारली, घेवडा, दुधीभोपळे बाजारात पाठवले जातात, तेव्हा मजूर, दलाल, हुंडेकरी, भरेकरी, हमाल, भाडेखर्च ह्या सर्वांचा वाटा जाऊन शेतकऱ्याच्या हातात अतिशय नगण्य पैसे येतात… तेव्हा मात्र शेतकरी निराश होतो, कारण पुढच्या लागवडीसाठी त्याला पुनः पुनः भांडवल लागते व ते पुरेसे न मिळाल्याने त्यापायी कर्ज काढावे लागते, हे दुष्टचक्र चालूच राहिलं किंवा दुष्काळ, अवर्षण पावसाची गारपीट झाली. एखादा रोग साऱ्या पिकावर पडून उभ्या पिकाचं नुकसान झाले तर शेतकरी परत

उभा राहणं दुरापास्त होतं. गरीब शेतकरी गरीबीतच लोटला जातो नी, मग…

माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा

त्याच्या भाळी राहिलेला रातदिस कामधंदा

कष्ट सारे त्याच्या हाती… दुसऱ्याच्या हाती माप

आम्ही कष्टाचेच खातो, जग करी हापाहाप !

असं म्हणावं वाटतं.

या निराशेच्या गर्तेतून तो जर निघालाच नाही तर… मग… मनोरुग्ण होणं, व्यसनाधीन होणं, थेट आत्महत्यांपर्यंत त्याची मजल जाते.

मला तर शेतकरी बंधूंना सांगावसं वाटतं, बाबांनो, असं करू नका. केंद्रसरकार राज्यसरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते, उपक्रम घेते, अनुदान देते. फळबाग, वनशेती, परसबाग, योजनांतर्गत, सामाजिक वनीकरणाच्या साहाय्याने
शेतातील बांधांवर झाडे लावून घ्या. फळझाडे लावा, वनशेती करा. मुख्य पिकांमध्ये दोन दोन आंतरपिके घ्या. ‘साक्षर’ होऊन बाजारपेठेचा, गिन्हाइकाच्या मागणीचा अभ्यास करा, त्याप्रमाणेच पिके घ्या. मोठमोठ्या कंपन्या पुनर्खरेदी करार करतात, त्यांच्याकडूनच लागवडीला रोपे देतात, ती घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची संघटना करा. दर आठ दिवसांनी एका ठिकाणी जमा. आपापल्या पिकांसंबंधी उदा.पपई रोपाची लागवड, कीड, वाढ, कीटक प्रतिबंधक उपाय, फवारणीचे नियोजन, खतांचे पाण्याचे व्यवस्थापन, बाजारपेठा, दर ह्यासंबंधी चर्चा करा.

अरे, भागवत सप्ताह बसला की, आपण सारे कथा ऐकायला बसतोच नां! मग शेतकन्यांनी ‘शेती सप्ताह’ कायमच सुरू ठेवायला काय हरकत आहे? आता तर संगणक, इंटरनेटचे जाळे आहे तुमच्या दिमतीला. ते तुम्हाला हव्या त्या पिकाची हवी ती माहिती क्षणभरात पुरवेल. देश- विदेशीची पुस्तके सांगेल. कृषीविषयक, हवामान, पावसाविषयक माहिती देईल. त्या माहितीला पूरक असे पुरावे सांगेल तेही बसल्याजागी! आवश्यकता आहे प्रामाणिक प्रयत्न व विद्या यांची सांगड घालण्याची! एकमेकांवर, सरकारवर दोषारोप करून काय साधणार ? देश माझा नि मी देशाचा, असं म्हणून माझंही काही कर्तव्य आहे असं माना नि कामाला लागा.

सरकार सतत शेतकन्याला प्रोत्साहनच देते. सहकारी तत्त्वावरील शेतीला प्राधान्य देते. अल्पभूधारकाला सवलती देते. अगदी त्याला मोटार, ट्रॅक्टर, अवजारे घ्यायला सुद्धा! शेतकन्याच्या मालाला भाव नीट दिला नाही, तर लगेच आत्महत्या हा त्याला उपाय नव्हे, आंदोलनासारखे उपाय वापरा व सरकारला आपले मागणे ऐकायला लावा. कित्येक सरकारी योजना तुमच्यापर्यंत येतच नाहीत त्या माहीत करून घ्या. त्यांचा पाठपुरावा करा. धरणीमातेला पुन्हा नटवा, हिरव्यागार शालीने सजवा एवढंच!” अर्जुनदादांचे डोळे भरून आले होते. त्यांच्या पोटतिडिकीच्या शब्दांनी मीही भारावलो. आज बऱ्याच नवीन गोष्टी मला कळल्या होत्या!

‘गृहिणी गृहम् उच्यते’ तसेच ‘कृषीवले राष्ट्रम् उच्यते’ असं म्हटलं तरी उचित ठरणार आहे.

 

Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध
Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

 

 

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध १० ओळी 

 

शेतकरी म्हणजे व्यक्तीचं जीवन असा जो जणांना अनेक अनुभवांना साक्षात्कार करतो. शेतीच्या क्षेत्रातील कष्ट आणि सुख, त्याच्या देवाचं आभार असा असलेला व्यक्ती समृद्ध असतो. शेतकरी ह्याचं असंख्य काम करतो, पण त्याचं मानसिक अस्तित्व हे स्वतःचं विशेष आहे. शेतकरीचं जीवन हे आपलं स्वभाव, आधार व स्वभावाचं अटी असलेलं जीवन असतं.

शेतीच्या जगातील काही महत्वाच्या मुद्दे आणि मूलभूत संस्कृतीचं वापर हे शेतकर्याचं मनोगत असतं. शेतीचं मनोगत आणि अधिग्रहण असलेलं सामाजिक जीवन, त्याच्या रोजच्या व्यवस्थेचं विशेष आणि अत्यंत महत्वाचं भाग असतं.

शेतकरी विशेषतः वनस्पतिजगत, प्राणीजगत, आणि अन्नधान्यांचं ध्यास करतो. त्याच्या जीवनाचं ध्यास आणि धैर्य हे शेतकरीचं मनोगत सुख असतं. वर्षभर उत्तरोत्तर अशा वळणांच्या जीवनात त्याचं असंख्य काम करावं लागतं. शेतीच्या क्षेत्रात संतोष, शांतता, धैर्य ह्या स्वभावाचं विकसित करण्याचं अत्यंत महत्व आहे.

शेतकरीचं मनोगत जीवन ह्या विशेष आणि सांस्कृतिक बळाचं पण समृद्ध असतं. त्याच्या मनात धैर्य, संप्रेमा, धर्मनिरपेक्षता, आपल्या क्षेत्राचं विकास करणारं विचार ह्या त्याचं मनोगत आहे.

शेतकरीचं मनोगत जीवन ह्या साधारणता आणि आत्मनिर्भरतेचं भाव असतं. त्याच्या जीवनाचं त्याचं वळण व्यक्तीचं स्वाभाविक भाग असतं. त्याच्या जीवनाचं आनंद आणि संतुष्टी ह्या त्याचं मनोगत आहे.

शेतकर्याचं मनोगत जीवन ह्या आपल्या क्षेत्राचं विकास करणारं भाव दर्शवितं. वैशिष्ट्यपूर्ण जीवन, भूमिका, आणि ध्येयांना पूर्णत्वाने मिळवण्याचं विचार ह्या शेतकरीचं मनोगत असतं.

शेतकर्याचं मनोगत जीवन ह्या स्वतंत्र आणि आनंददायी असतं. त्याच्या वळणांचं जीवन व्यक्तीचं धन्यवाद आणि समृद्ध असतं.

नोंद: ह्या निबंधातील मजकूर माझ्या स्वतंत्र अनुभवांवर आणि माझ्या ज्ञानावर आधारित आहे. अतः इथे दिलेल्या निबंधातील सर्व मजकूर विचारायचं असल्यास, स्वतःचं लक्ष घातल्यास आश्चर्य नको.

शेतकरीचं जीवन म्हणजे भारतीय संस्कृतीचं सर्वांगीण जीवन. यात्रेचं अर्थ आपल्याला समजायचं आहे. शेतकरी म्हणजे संपूर्ण जगचं आधार, संपूर्ण विश्वाचं मंच. त्याचं जीवन अनेक रंगांनी बदलतंय, परंतु तो खचंड असंच असतंय. त्याचं उत्पादन व धार्मिकतेचं यात्रेत लोकांचं श्रद्धा आहे. त्याचं मनोगत अनुभव करणारं असं आपलं कर्तव्य आहे.

शेतकरी जीवनाचं मनोगत अनुभव म्हणजे प्रकृतीचं संगीत, प्राकृतिक सौंदर्यांचं आनंद. तो जीवन जर अनुभवायला मिळत असेल तर तो शिवाय काहीच नाही. शेतकरीचं मन त्याच्या शेतीवर आणि उत्पादनावर सर्वदा लगतंय. अशाचं अनुभव करणारं शेतकरी जीवन जी दिलेली आहे, ती अनुभवण्याचं आनंद करणारं आहे.

 

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध विडियो माध्यमातून 

Video credit : Learn With Jeevan Youtube channel

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता :

Shetkaryache manogat
Shetkaryache manogat nibandh
Shetkaryache Manogat Nibandh Marathi। शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध
शेतकरी मनोगत मराठी निबंध – SHETKARYACHE MANOGAT
शेतकऱ्याचे मनोगत निबंध Essay on shetakaryache manogat

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

Mobile Che Manogat Marathi Nibandh। मोबाईलचे मनोगत मराठी निबंध

Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh। मला पंख असते तर मराठी निबंध

माझी शाळा निबंध मराठी। Majhi Shala Nibandh Marathi

माझा आवडता कवी निबंध मराठी । Majha Avadata Kavi Nibandh Marathi

संगणक काळाची गरज निबंध मराठी । Sanganak Kalachi Garaj Nibandh In Marathi

गुरु शिष्य परंपरा निबंध । Guru Shishya Paranpara Essay 

 

टीप :

1 ) शेतकरी मनोगत निबंध मराठी हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद.

Leave a Comment