परीक्षा नुकतीच संपली होती. एक-दोन दिवसांत सगळी मुले वसतिगृहातून आपापल्या गावी जाणार होती. त्यापूर्वी एखाद्या जवळच्या सहलीला जाण्याची टूम निघाली. या मावाच्या टोकाला रेल्वेस्थानकाच्या पलीकडे एक उपवन आहे. झाडांची नई गावातूनही दिसत असे. तेव्हा त्याच उपवनात जाऊ या, अशी कल्पना संमत झाली.
दिवशी भल्या पहाटे आम्ही सर्व विद्यार्थी स्टेशनच्या पलीकडे गोळा आलो तेथून ती वृक्षराई स्पष्ट दिसत होती. पण तेथे जाणे शक्य नव्हते, कारण नदीचा एक फोटा मध्ये पसरलेला होता. आता पलीकडे कसे जायचे या विचारात आम्ही असताना एक छोटीशी होडी] किनाऱ्याकडे येताना दिसली. होडीत बसून नदी पार करणे शक्य होते.
होडीतून एका वेळी आठजणांना पलीकडे जाता येत होते. गंमत म्हणजे या नौका बायका चालवत होत्या. सहलीची सुरवातच अशा नौकानयनाने झाल्यामुळे आम्ही अधिकच खुललो.
आता आम्ही त्या वनराईच्या जवळ आली होती. आगाऊ संमती घेतली नव्हती, म्हणून आम्हाला दाराशीच अडवण्यात आले; पण तेथील म्हातारबाबांनी आमचा उत्साह बघून आम्हांला बनात फिरण्यास संमती दिली. मागाहून आम्हांला कळले की ते आजोबा या वनराईने मालक आहेत. ती बनराई हो त्यांचा ध्यास आहे. लष्करात नोकरी करत असताना जगातून वेगवेगळी झाडे आणून त्यांनी आपली हो बडलोपार्जित भूमी अधिक विकसित केली होती, आणि आता हे सर्व निसर्गवैभव सर्वांसाठी खुले केले होते.
त्या आजोबांबरोबरच आमचा फेरफटका सुरू झाला. आकाशाला भिडलेले माड नारळांनी लगडले होते. आंबा, पेरू या नेहमीच्या झाडांबरोबरच तेथे केशर, वेलदोडा जायफळ यांचोपण झाडे होती. त्यांच्यातून फिरताना मस्त सुगंध येत होता. एक हिरवेगा पोपटी झाड पोपटांनी इतके भरलेले होते की, त्याच्यावरची पाने शोधावी लागत होती काह झाडीवर माकडे उड्या मारत होती. त्यामुळे आमच्या माकडचेष्टानाही ऊत आला. झाडांव लावलेले झोके घेत आम्ही मोठमोठ्यांनी गाणी म्हटली.
खूप भटकंती झाल्यावर पोटातील कावळे ओरडू लागले. आजोबांनी वनविहारासाठ येणाऱ्यांकरता तेथे गरमागरम भाकरी- पिठल्याची व दहीभाताची व्यवस्था केली आहे त्याची चव न्यारीच होती. जेवणानंतर थोडी विश्रांती झाली.
ही विश्रांती आटोपती घ्यावी लागली कारण अजून उरलेली बाग पाहायची होती. संपन्नतेने मात्र आम्ही दिपून गेलो होतो. मानवी ताता गळून पडला होता..
टीप :
1 ) वनविहारातील मौज निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.
2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .
मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.