मराठी सुविचार – Marathi Suvichar
![मराठी सुविचार - Marathi Suvichar](https://marathigrammar.in/wp-content/uploads/2022/11/123-300x300.png)
मराठी सुविचार – Marathi Suvichar अगधी सोप्या भाषेत मराठी मध्ये १०० पेक्षा जास्त सुविचार आम्ही आपणास साधर करत आहोत.
1) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
2) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
3) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
4) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
5) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
6) प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
7) आपण जे पेरतो तेच उगवतं.
8) जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
9) फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
10) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
11) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
12) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
13)शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
14 ) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
15) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
16) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
17 ) आधी विचार करा, मग कृती करा.
17 ) आधी विचार करा, मग कृती करा.
18)प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
19) आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
20) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
21)फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
22) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
23) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
24) अतिथी देवो भव ॥
25) सत्याने मिळतं तेच टिकतं.
26) अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
27) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
28)दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.
29)परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
30)आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
31) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
32) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
33) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
34)खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
35) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
36) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
37) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
38)चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. सुविचार
39) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
40) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
41) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
42)नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
43) जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
44) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
45) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
46) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
47) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
48) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
49)माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
50) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
मराठी सुविचार – Marathi Suvichar
51)क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
52)एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
53) सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
54)परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
55) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
56) खिडकी म्हणजे आकाश नसतं.
57) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
58) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
अधिक मौज फुलण्यात 59)जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज !
60) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
61)भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
62) कविता म्हणजे भावनांचं चित्र !
63) चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
64) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
65)व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
66)तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
67) आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
68)ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
69)तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
70)स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
71)अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
72) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
73) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
74) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
75) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
76)समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
77) आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
78) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
79) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
80) मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
81)प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
82) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
83) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
84) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या
85) अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
86) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
87) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय मौन ! –
88) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
89) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
90) आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
91) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
92) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
93)अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
94) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
95) अंथरूण बघून पाय पसरा.
96) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
97) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
98) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
99) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या
विषयी मौन पाळा.
100) अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
——————————————————————————————————————————————
मित्रांनो या सुविचार मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो . धन्यवाद ..