परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 

 

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 
परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये परीक्षा नसत्या तर मराठी निबंध लेखन / Pariksha Nasatya Tar Essay In Marathi  100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण परीक्षा नसत्या तर निबंध या विषयावर निबंध बघणार आहोत.

… 

अगदी परवा परवाची बातमी आहे ही. परीक्षेतील एक पेपर वाईट गेला, म्हणून एका शाळेतील नववीच्या एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुलाने, शाळेत, परिसरात एकच हलकल्लोळ माजला. काय झाले, कसे झाले, हैं समजून घेता घेता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुलाने आत्महत्या केली आणि सर्वजण पूर्णत: कोलमडलेच. बातम्यांना ऊत आला. चर्चावर चर्चा घडू लागल्या. उलटसुलट मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. मीसुद्धा चक्रावलेच होते. वाटले, मुलांना जीवच नकोसा करणान्या या परीक्षा हव्यातच कशाला ? त्या नसत्या तर…?

परीक्षेमागोमाग येणारा निकालाचा बडगा व्यक्तीच्या सान्या सुखावर आनंदावर हल्ला करतो. वर्षभर केलेल्या अभ्यासावी परीक्षा केवळ तीन तासांत घेतली जाते. एखाद्या क्षणी आपली मती चालत नाही. सहज सुटणारी गणित परीक्षेत सुटत नाहीत. नेहमीच्या गोष्टी आठवत नाहीत. नेहमी चालणारी लेखणी त्या काळात रुसून बसते आणि मग परीक्षेसाठी नेमलेले ते तीन तास संपून जातात आणि जाता जाता आपल्या साच्या स्वप्नांचा चुराडा करून जातात.

क्वचित एखादया अवघड क्षणी आपल्या भाळी ‘नापासा’चा बट्टाही लागतो. सान्या भोवतालच्या जगाकडून त्यामुळे आपण नालायक ठरवले जातो. परीक्षेत नापास झालेल्या अनेकांनी पुढे आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलेली आढळते; पण हे त्या क्षणी कोणी लक्षात घेत नाही. परीक्षाच नसती, तर हे टळले असते.

परीक्षा नसतात तोपर्यंत सर्वजण एकाच पातळीवर असतात. परीक्षेनंतर काही हुशार, काही ठरतात. परीक्षेनंतर काही यशस्वी, तर काही अयशस्वी ठरतात परीक्षातील टक्केवारी जीवनात मोठे बदल घडवते, हे लक्षात आल्यावर मग परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वाटेल ते मार्ग स्वीकारले जातात, परीक्षेत कॉपी करणे, पेपर फोडणे, खऱ्या परीक्षार्थीऐवजी दुसराच कोणीतरी परीक्षेला बसणे हे उपद्व्याप खूप वाढलेत.

आपल्याकडे मराठवाड्यात परीक्षा केंद्रावर शेकडोंनी माणसे जमतात आणि खिडक्यांतून कॉपी सरकवतात वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे बाहेर मोठमोठ्याने ओरडून सांगतात. बिहारमध्ये तर परीक्षा केंद्राच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व खिडक्यांवर बाहेरून चढतात आणि कॉपी करायला मदत करतात. शेकडो लोक केंद्रावर जमून बिनदिक्कत हे प्रकार करतानाचे दृश्य परवाच टीव्हीवर दाखवत होते! परीक्षा नसत्या तर हे घाणेरडे प्रकार घडलेच नसते.

खरे तर परीक्षेत मिळालेल्या गुणांवरून मुलांचे यश वा अपयश मापण्याची सवय लागल्यानंतर समाजाचीही घसरगु व्हायला लागली, माणसांची मती फिरली. परीक्षेचा विपरीत अर्थ रूढ झाला आणि ‘ही परीक्षाच नसती तर?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ आली.

परीक्षा नसती तर मात्र अनागोंदी माजली असती. कारण वर्षभर अभ्यास केल्यावर आपल्याला ज्ञान मिळाले की नाही, हे कसे तपासले असते ? किती ज्ञान मिळाले? ते कोणत्या दर्जाचे आहे ? हे कसे समजले असते ? परीक्षा नसेल तर पहिलीतून दुसरीत. दुसरीतून तिसरीत कसे जाता येईल ?

आपण परीक्षेचा चुकीचा अर्थ मनात बाळगला आणि घोटाळा झाला. ठरावीक पुस्तकातील माहिती सांगितलेल्या वेळेस लिहिणे म्हणजे परीक्षा, ही आपली परीक्षेची कल्पना, जो पुस्तकातील माहिती जशास तशी लिहील तो हुशार, खरे तर जीवनात प्रत्येक क्षणाला आपण परीक्षा देत असतो आणि घेत असतो. एखादया हॉटेलमधील पदार्थ आपल्याला आवडले नाहीत, तर आपण पुन्हा तेथे जात नाही. म्हणजे आपण त्या हॉटेलला नापास करतो.

अहो, गायसुद्धा गवत खाण्यापूर्वी ते हुंगून बघते ज्याला गाडी नीट चालवता येत नाही, त्याच्या गाडीत आपण बसू का? ज्याला घर बांधण्याची माहिती नाही, त्याने बांधलेल्या घरात आपण राहू का? म्हणून नोकरीवर एखाद्याची परीक्षा घेऊनच नेमणूक केली जाते.

परीक्षा नसेल तर समाजाची कामेच होणार नाहीत आणि झाली, तरी दर्जेदार होणार नाहीत. मग प्रगती अशक्य. याचा अर्थच हा की प्रगती हवी असेल, तर परीक्षा घ्यावीच लागेल म्हणून ‘परीक्षा नसल्या तर..?’ हा प्रश्नच निरर्थक आहे.

 

परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi 
परीक्षा नसत्या तर निबंध । Pariksha Nasatya Tar Essay In Marathi

 

परीक्षा नसत्या तर  १० ओळी  निबंध । Pariksha Nasatya Tar 10 Line Essay 

 

परीक्षा नसल्यावर किंव्हा परीक्षा नसत्या तर याचे काही फायदे देखील आहे आणि काही नुसकान देखील आहे .

परीक्षा नसत्या तर सगळे मूल मुली ही अभ्यास करणे सोडून दिले असते

परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांचे गुण काढता आले नसते . कोणत्या विद्यार्थ्याची काय पात्रता आहे हे समजल नसत .

परीक्षा नसत्या तर मुले ही कसलाच टेंशन घेणार आहेत . व आतमात्या करणार नाही .

परीक्षा नसल्यावर मुले पाहिजे त्या फील्ड मध्ये जाऊ शकतील .त्यामूळे त्यांना जे विषय जमात नाहीत ते देखील अवघड जातील .

परीक्षा नसल्यावर विद्यार्थी हा बेशिस्त होईल , आणि त्याला अभ्यासाचे महत्व समजणार नाही .

परीक्षा नसत्या तर जे विद्यार्थी परिक्षाच्या काचणे तरसतात ते मोकळे होतील .

परीक्षा नसल्यावर विद्यार्थी हे शाळा सुटल्यावर घरी गेल्यावर अभ्यास न करता टीव्ही किवहा मोबाईल वापरत बसतील .

परीक्षा नसल्यावर विद्यार्थी ना गणित जमणार आणि व भविष्यात त्यांना साधे साधे गणित सुद्धा जमणार नाहीत .

परीक्षा नसल्यावर विद्यार्थी मेहनत न करता अभ्यास न करता थेट पुढच्या वर्गात जाईल .

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता 

  • Pariksha nastya tar nibandh lekhan in marathi 
  • Nako tya pariksha । नको त्या परीक्षा 
  • Essay on if exams are not there in Marathi
  • Pariksha nastya tar essay in marathi 
  • Pariksha nastya tar nibandh

 

  • परीक्षा नसत्या तर निबंध विडिओ माध्यमातून 

Video Credit : VINUSHREE Erandoli Youtube channel 

 

आमच्या इतर निबंध पोस्ट :

टीप :

1 ) परीक्षा नसत्या तर निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

Leave a Comment