श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay 

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay
श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

 

मित्रानो , या पोस्ट मध्ये श्रमाचे महत्त्व निबंध  मराठी निबंध लेखन / Shramache Mahattva Essay 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत वैचारिक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा.  आज आपण Shramache Mahattva Essay  या विषयावर निबंध बघणार आहोत.

…. 

वेदकाळात श्रमांचे महत्त्व सर्वमान्य होते. बालकाला ज्ञानग्रहणासाठी गुरुगृही राहावे लागे आणि गुरू व गुरुपत्नी बांध्यासाठी आश्रमाची सफाई करणे, फुले गोळा करणे, जंगलातून लाकडे आणणे, यज्ञासाठी समीधा गोळा करणे अशी कामे करावी लागत. पूर्वीच्या काळी श्रम आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ झालेला असे, त्यातूनच विदयार्थ्याच्या शरीरावर व मनावर श्रमसंस्कार होश.

पुढे वर्णव्यवस्थेमुळे श्रमांची प्रतिष्ठा कमी होऊ लागली कालांतराने वर्णाच्या जाती झाल्या, जातीमुळे कर्मठपणा आला. शूद्रांनी उच्चवर्णीयांची सेवा करायची, हे ठरून गेले. त्यांच्या श्रमांना कमी लेखले जाऊ लागले. शिक्षणापासून शुद्र वचित झाले. या सान्या अन्यायकारक प्रकारातून श्रमांची श्रेष्ठता हरपली.

ब्रिटिशांच्या काळात आंग्लविद्याविभूषित असा एक पांढरपेशा वर्ग तयार झाला. शिक्षणाच्या संदर्भात सुशिक्षित, अशिक्षित असे दोन वर्ग तयार झाले त्यातील अशिक्षितांना कमी लेखले जाऊ लागले, त्यांच्या वाट्याला फक्त कष्टाचे जीवन आले. त्यातून कमी दर्जाचा अमिक वर्ग तयार झाला. हा भेदभाव नाहीसा करून श्रमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक थोर व्यक्तींनी प्रयत्न केले.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा यानी आपली सर्व कामे आपण स्वतः करून आश्रमवासीयांना स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला. श्रमांचे महत्त्व पटवून दिले, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी यांनीही सर्व प्रकारची शारीरिक श्रमांची कामे करून कोणत्याही प्रकारचे श्रम हलके नसतात, हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.

मुलांना लहानपणापासून श्रमश्रेष्ठता समजावी. लहानपणापासून श्रम त्यांच्या अंगवळणी पडावेत, म्हणून गांधीजींनी अभ्यासक्रमात कुटीरोद्योगांचा अंतर्भाव करण्याचा आग्रह धरला. मुदलियार, कोठारी, गजेंद्रगडकर यांसारख्या शिक्षण आयोगांनी शिक्षणक्रमात समाजसेवा, कार्यानुभव यासारखे विषय समाविष्ट केले. पण विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबरोबर ते सारे प्रयत्न केवळ वरवरचे ठरले.

श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay
श्रमाचे महत्त्व निबंध। Shramache Mahattva Essay

 

सध्याच्या यांत्रिक, धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत माणसाला सतत धावपळ करावी लागते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना तर घरचे स्वयंपाकपाणी उरकून कार्यालय गाठावे लागते. पण कामाचे स्वरूपच बदलत गेल्याने शरीराला व्यायाम मिळण्याऐवजी फक्त दगदगच होऊ लागली. अनेकांच्या बाबतीत तर बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे योग्य त्या प्रमाणात शारीरिक हालचालच होत नाही.

शरीराची हालचाल मंदावल्यामुळे मेद वाढतो. त्यातून मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, हृदयविकार असे आजार संभवतात. ‘श्रम’ याचा अर्थ कष्ट नसून शारीरिक चलनवलन असा आहे. श्रम म्हणजे शरीराला अनुकूल असा व्यायाम होय.

श्रमांमुळे शारीरिक हालचाल होते. त्यातून उत्साह, चैतन्य, स्वावलंबन या गोष्टी प्राप्त होतात. स्वावलंबन म्हणजेच स्वातंत्र्य भारताच्या दिवंगत प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी दिलेल्या ‘कठोर परिश्रमांना पर्याय नाही’ या संदेशात तरी दुसरा कोणता हेतू होता ?

 

वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता : 

श्रमाचे महत्त्व निबंध । shramache mahatva nibandh 

श्रम हीच देवता निबंध । Shram Hich Devata Essay
श्रमाचे महत्त्व मराठी निबंध । Shramanche Mhahattva Marathi Essay
कष्टाचे महत्व मराठी निबंध । Kashtache Mahattva Marathi Essay

 

आमच्या इतर निबंध पोस्ट : 

टीप :

1 ) श्रमांचे महत्त्व निबंध हा मराठी निबंध class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १0 वी व ११ वी १२ वी ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

2 ) इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विदयार्थ्याने आवश्य वाचावे .

 


 

मित्रांनो या निबंध मध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो.

धन्यवाद. 

Leave a Comment